Thursday, 15 March 2018

हॉकिंग गेले तेव्हाची गोष्ट...

त्या दिवशी मी मरीन ड्राइव्हला येऊन बसलो होतो. बसल्यावर फेसबुक उघडलं, कुणीतरी news शेअर केली होती...

"Physicist Stephen Hawking passes away"

माझ्या डोळ्यांनी ती बातमी यांत्रिकपणे वाचली आणि मी मोबाईल लॉक करून खिशात ठेऊन दिला. मी शेवटचा मोबाईल तेव्हा वापरला होता. त्यामुळं मला ती स्पेसिफिक बातमी वाचल्याचं आठवतंय. माझ्या डोक्यात विचार घोंगावत होते....सॉरी मी पर्सनल सांगायला लागलो. पण आधी तुम्हाला त्यावेळी जगात काय चालू होतं ते सांगायचंय नाही का.

ओक्के. मी माझ्याबद्दल नंतर सांगतो, पहिल्यांदा त्यावेळी जगात काय चाललं होतं ते आठवेल तसं सांगतो.

सगळ्यात शेवटची महत्वाची बातमी आत्ता सांगितली तशी Stephen Hawking ची होती. माझा रुममेट एखाद्या दिवशी कुणा मोठ्या व्यक्तीचा जन्मदिवस वैगेरे असला की whatsapp ला त्या व्यक्तीचा फोटो स्टेटसला टाकायचा. म्हणजे तो UPSCचा अभ्यास करत होता, आणि त्याला सगळ्या गोष्टींबद्दल सगळं कसं माहिती आहे हे दाखवायची आवड होती, म्हणजे मला तर असं वाटायचं बर का. तर त्या दिवशी सकाळी उठल्यावर मी नेहमीप्रमाणं whatsapp वर सगळ्यांचे स्टेटस पाहत होतो, तेव्हा त्याने Einstein चा टाकलेला फोटो पहिला. मी त्याला विचारल्यावर त्यानं सांगितलेलं की आज Einstein चा वाढदिवस आहे. आणि आपण रोहित शेट्टीचा फॅन होतो, म्हणजे आहे. आपल्याला त्याच्या पिक्चरमध्ये हवेत उडवलेल्या गाड्या जाम entertainig वाटतात. तेव्हा whatsapp पाहून झाल्यावर फेसबुक बघताना रोहित शेट्टीच्या फॅन पेजवर त्याचा बड्डे असल्याचं कळालं. आणि नंतर आमिर खानचा बड्डे असल्याचंही कळालं, लक्षात राहिलं, कारण मी माझ्या whatsapp स्टेटसला आमिरचा आणि रोहित शेट्टीच्या बड्डेचे स्टेटस टाकले होते.

हे सगळं सांगितलं कारण त्या दिवसात याच गोष्टी मी फेसबुक-whatsapp वर पहिल्या होत्या, त्या लक्षात राहिल्या. आणि आता हे सांगताना अचानक आठवलं की त्या दिवसाच्या साधारण एक आठवड्यापूर्वी वैगेरे श्रीदेवीपण Rest in Peace झालेली..... मला आवडायची, म्हणजे माधुरीनंतर तीच आवडायची.
आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो, आमच्या रुममेटला स्मिता पाटील आवडते.

तर हॉकिंग गेला त्या दिवसाच्या आदल्या दिवशी मुंबईत आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता. लाल झेंडे घेऊन मोठ्या संख्येने ते शेतकरी मुंबईत आले होते.
माझ्या त्या रुममेटने सांगितलं त्याप्रमाणं त्या आदिवासींना ते कसत असलेल्या जमिनी आपल्या नावावर करता येत नव्हत्या. तसा कायदा वैगेरे पास झाला होता तरी ते कसत असलेल्या जमिनींवरील हक्क त्यांना मिळाले नव्हते. मोर्चातली ही मुख्य मागणी होती. त्या रुममेटला...त्याला आम्ही KD म्हणायचो. आम्ही म्हणजे आम्ही तिघ राहत होतो. तो SIAC ला होता.....
व सॉरी मी परत पर्सनल सांगू लागलो. तर सांगायचं काय होतं की KD ला बऱ्यापैकी नॉलेज होत बर का...तसा सांगायचा तो बरीच माहिती, सगळं कळल्यावर चांगलं वाटायचं...पण तरी मला त्याचा उगाच राग यायचा. तो दिखाऊ आहे असं माझं मत झालं होतं.

हा, तर तो मोर्चा यशस्वी झाला आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायचं आश्वासन दिल्याचं KD न मला सांगितलेलं मला आठवतंय. जगाबद्दल सांगायचं झालं तर KD आणि त्याचा मित्र डोन्या...त्याच नाव माहिती नाय, पण तो मित्र आला की KD आणि तो ट्रम्प-अमेरिका-रशिया-कोरिया-अंटार्क्टिका ते मोदी आणि पुन्हा ट्रम्प अशा ढीगभर विषयावर बोलायचे...तो आला की एकदातरी ट्रम्पला शिव्या द्यायचा...त्यामुळं आम्ही म्हणजे KD सोडून आम्ही दोघा रुममेटनी त्याच नाव डोन्या ठेवलं होतं. हा तर काय सांगत होतो की KD आणि डोन्या जगाबद्दल बोलायचे सारखे. ग्लोबल वॉर्मिंग का क्लायमेट चेंज कमी करण्यासाठी पॅरिसला कसला करार झाला होता. त्यातून डोनाल्ड ट्रम्पमुळं अमेरिका बाहेर पडलेली. आणि अमेरिका दरवेळीच कशी ढोंगीपणा करते याबद्दल KD तावातावानं सांगायचा. KD कडून ऐकलेल्या गोष्टीच सांगू शकतो मी जगाबद्दल.
आणि हो नॉर्थ कोरियान nuclear test केली होती बहुतेक आणि अमेरिकेनं साऊथ कोरियात त्यांची मिसाईल सोडायचा बेस वैगेरे तयार केला होता असंही KD बोलला होता.

KD आणि डोन्या असो किंवा आणखी कुणीही असो, भारतातल्या politics वर बोलायला लागले की मला जाम उदास वाटायचं. विषय एकच असायचा, त्या विषयाभोवतीच चर्चा फिरायची. तो विषय म्हणजे मोदी. आणि चर्चा करणारे सगळे तीन गटात विभागलेले होते, एक गट म्हणायचा मोदींसारखा ग्रेट माणूस नाही. दुसरा गट म्हणायचा मोदीसारखा वाईट माणूस नाही. तिसरा गट माझ्यासारख्यांचा होता. बोअर माणसांचा. फेसबुक, व्हाट्सप्प, पेपर आणि मित्रांच्या चर्चा...सगळीकडच्या चर्चा कुठंही सुरू झाल्या की याच विषयाला येऊन मिळायच्या आणि मग याच विषयाच्या बाजूने आणि विरुद्ध बोलणाऱ्यांच्यात मवाळ ते जहाल चर्चा व्हायच्या. आणि कधीकधी विषय इतका पेटायचा की एकमेकांची पर्सनल उनीधुनी काढली जायची....कधी कधी मजा यायची, पण बऱ्याचदा उदास व्हायचं. असल्या चर्चा सुरू झाल्या की मी मोबाईल काढून एलियन शूटर खेळत बसायचो. त्यामुळं भारताच्या politics बद्दल मी काही सांगू शकत नाही कारण मला आणखी उदास वाटेल....
जाऊदे तो विषय...

त्यावेळच्या जगाबद्दल...हा त्यावेळी मोबाईलचा वापर प्रचंड वाढला होता. म्हणजे मोबाईलशिवाय जगण अशक्यच झालं होतं. सकाळी मोबाईलच्या अलार्म ऐकून जाग येत होती आणि रात्री फेसबुक-व्हाट्सअप्प-युट्युब बघत झोप लागत होती. म्हणजे आमच्या रूमवर साधारण संध्याकाळी आम्ही तिघ नावाला एकत्र राहायचो, तिघांच बोलणं खूप कमी असायचं. तिघंही मोबाईल पाहत बसलेलो असायचो, काही काम नसलं तर. मेसवाल्याचा डबा यायचा, मग जेवतानाही बऱ्याचदा तिघ मोबाईल पाहत जेवायचो. आणि जर डबा नाही आला तर आम्ही ऑनलाईन ऑर्डर मागवायचो. आमच्या दुसऱ्या रुममेटचा मुलगी पाहायचा कार्यक्रम सुरू झाला होता, तर मुलींचे फोटो आणि बायोडाटा त्याला व्हाट्सअप्पवर यायचे. तो कोल्हापूरचा होता, सारखं मुली पाहायला जाणं त्याला शक्य नव्हतं म्हणून तो व्हाट्सअपवर फोटो आणि बायोडाटा मागवायचा. मग त्याला एखादी आवडली तर आम्ही दोघे तिची माहिती फेसबुकवरून काढायचो. KD आम्हाला असलं करताना बघून आम्हाला शिव्या घालायचा...त्याला हे चिप वाटायचं. आम्हाला हा चिप म्हणायचा...यानं मात्र त्याच्या गर्लफ्रेंडच्या अकाउंटची डिटेक्टिव्हगिरी करायचा. म्हणजे एकदा आमच्या समोर फोनवरून तिला "त्याच्याशी का बोलतेय अजून फेसबुकवर....हो मी वाचले तुझे मेसेज, पण तू अजून का बोलतेय त्याच्याशी" असलं जोरात ओरडतात ऐकलं होतं. साला हापण ढोंगीच होता....

सॉरी, लय भरकटलो. तर सांगायचं काय तर मोबाईल म्हणजे खूप महत्वचा झाला होता.

आणखी काय सांगू....
हा जगाबद्दल विचारतोय म्हणून सांगतो बर का,
डी सी कॉमिक चा जस्टीस लीग आला होता आणि मार्व्हल चा इन्फिनिटी वॉर अजून यायचा होता. म्हणजे मी जस्टीस लीग पहिला नव्हता, आपल्याला मार्व्हल आणि avengers जास्ती आवडतात. सगळ्यात जास्ती आयर्न मॅन....रॉबर्ट.
आणि आमिरचा ठग्स ऑफ हिंदोस्तान अजून यायचा होता....
हो...पद्मवतीच्या वेळी खूप दंगा झाला होता...

डोकं दुखायला लागलंय ओ.
अचानक...
आता बास करतो जगाबद्दल...
माझं थोडं सांगतो....

....डोकं जड व्हायला लागलंय...

हा,
म्हणजे मी कंपनीत resign चं इंटिमेशन HR ला देऊन त्यादिवशी मरिन ड्राइव्हला आलो होतो. मघाशी सांगितलं तसं डोक्यात विचार घोंगावत होते. कंपनीत एक दिवस सुद्धा राहायची इच्छा नव्हती. पिळून काढत होते साले. गेल्याच आठवड्यात बॉसशी जोरात भांडण झालं, आणि ठरवलं तस आज इंटिमेशन देऊन आलो. जरा मोकळं वाटंत होतं, पण टेन्शन जास्त आलं होतं.

मला मरीन ड्राइव्हनंतरच काही आठवेना...
अरे काहीच आठवेना...

मी इथं कसा आलो?
मी कुठं आहे?


आ....
माझं डोकं दुखू लागलंय जोरात....
जड होऊ लागलंय...

माझे डोळे पण दुखायला लागलेत...
काय होतंय मला?

तुम्ही....

अरे !!

अरे तुम्ही कोण आहात?
मी इतका वेळ काय बडबडत होतो??

आणि...ब्लर कसे दिसताय सगळे?

तुमच्या माग...त्या वायरी तर स्पष्ट दिसताहेत...

तुम्ही सगळे......तुम्ही .....होलोग्राम!

आ .....
डोकं फुटायला झालंय....

मी कुठं आहे?
.
.
.
....माझं डोकं....

~end~


_________________________________________________________

Inspiration :
• Hawking expressed concern that life on Earth is at risk from a sudden nuclear war, a genetically engineered virus, global warming, or other dangers humans have not yet thought of. (Ref : wikipedia, NYT, The Daily Telegraph)

• Hawking stated that, given the vastness of the universe, aliens likely exist, but that contact with them should be avoided. He warned that aliens might pillage Earth for resources. In 2010 he said, "If aliens visit us, the outcome would be much as when Columbus landed in America, which didn't turn out well for the Native Americans." (Ref : wikipedia, NYT, The Daily Telegraph)

• Hawking warned that superintelligent artificial intelligence could be pivotal in steering humanity's fate, stating that "the potential benefits are huge... Success in creating AI would be the biggest event in human history. It might also be the last, unless we learn how to avoid the risks." (Ref : wikipedia, The Independent, BBC News)

• Hawking feared Donald Trump's policies on global warming could endanger the planet and make global warming irreversible. Hawking said, "Climate change is one of the great dangers we face, and it's one we can prevent if we act now. By denying the evidence for climate change, and pulling out of the Paris Climate Agreement, Donald Trump will cause avoidable environmental damage to our beautiful planet, endangering the natural world, for us and our children." Hawking further stated that this could lead Earth "to become like Venus, with a temperature of two hundred and fifty degrees, and raining sulphuric acid". (Ref : Wikipedia, BBC News,The Independent)

• And this one :
In 2006 Hawking posed an open question on the Internet: "In a world that is in chaos politically, socially and environmentally, how can the human race sustain another 100 years?", later clarifying: "I don't know the answer. That is why I asked the question, to get people to think about it, and to be aware of the dangers we now face."

(Ref : Wikipedia, The Guardian)


1 comment: